Home मराठवाडा पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येचा घनसावंगीत तीव्र निषेध

पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येचा घनसावंगीत तीव्र निषेध

179

पत्रकार हत्ये प्रकरणी गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी, पोलिसांना कुंभार पिंपळगाव येथील पत्रकारांचे निवेदन

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

अहमदनगर जिल्ह्यातील रावेर येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे अपहरण करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून हत्या करण्यात आली आहे.दोषी गुन्हेगार आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी घनसावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्याकडे पत्रकारांनी निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील रावेर येथील पत्रकार रोहिदास दातीर यांच्यावर समाजातील काही अमानूष गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून अपहरण करून प्राणघातक हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली आहे.सदरील घटना हि निंदणीय असून पत्रकारांवर दबाब निर्माण करण्याचा प्रकार आहे.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे,मात्र समाजातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून अशा घटनेत वाढ होत आहे.
सदरील घटनेतील दोषी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून शिक्षा देण्यात यावी,असे शेवटी निवेदनात म्हटले आहे.

यावेळी पोलिस उपनिरीक्षक शिवसिंग बहूरे, पोलीस हवालदार रामदास केंद्रे यांची उपस्थिती होती.निवेदनावर पत्रकार संघाचे जालना जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर, विष्णूदास आर्दड, रामेश्वर लोया, कौतिक घुमरे, कुलदीप पवार, गणेश ओझा, अनिल गायकवाड,अजय गाढे, नागेश शिंदे, संभाजी कांबळे, किशोर शिंदे,भागवत बोटे, विष्णू व्यवहारे,शेख सोहेल, अशोक काळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.