Home विदर्भ जिल्हाधिकारी यांची कृषी केंद्रांना भेट ,  साठा नोंदवहीची तपासणी.!

जिल्हाधिकारी यांची कृषी केंद्रांना भेट ,  साठा नोंदवहीची तपासणी.!

77

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

बियाण्यांचा तुटवडा पडेल काय’ विषयावर झाली चर्चा जाणल्या कृषी व्यावसायिकांच्या समस्या….!

वर्धा – जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी शनिवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास अचानक वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठ गाठून तेथील कृषी केंद्रांची पाहणी केली. यावेळी त्यांनी कृषी केंद्र व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या स्टॉक रजिस्टरची तपासणी केली. शिवाय यंदा बियाण्यांचा तुटवडा पडेल काय याबाबत त्यांच्याशी चर्चेद्वारे अधिकची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी कृषी विभागाचे मंडळ अधिकारी घायतिडक यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी थेट कृषी केंद्रात जाऊन बियाणे खरेदीसाठी आलेल्या काही शेतक-यांसह कृषी केंद्र व्यावसायिक मनोज भुतडा, रवी बन्नोरे, बिसानी यांच्याची संवाद साधला. शिवाय विदर्भ अ‍ॅग्रो या कृषी केंद्रासह सुमारे आठ कृषी केंद्रांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी कृषी केंद्रांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत काय, खत व बियाणे यांचा तुटवडा आहे काय,यंदा शेतक-यांकडून कुठल्या पिकाच्या बियाण्यांची मागणी जास्त आहे, आदी विषयाची माहिती जाणून घेतली. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे सध्या शेतकरी बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रांमध्ये येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कृषी केंद्र जास्त वेळ सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी कृषी केंद्र व्यावसायिकांनी जिल्हाधिका-यांकडे केली.