Home विदर्भ कात्री घाटावरून वर्धा नदीवरून खुलेआम रेती तस्करी याकडे मात्र महसूल विभागाचे दुर्लक्ष

कात्री घाटावरून वर्धा नदीवरून खुलेआम रेती तस्करी याकडे मात्र महसूल विभागाचे दुर्लक्ष

25

यवतमाळ जिल्ह्यातील रेती तस्कर व परीसरातील रेती तस्कर कात्री या वर्धा नदीवर जहाजाच्या साह्याने व बोटीच्या साह्याने करतात रेतीचा ऊपसा

अल्लीपुर . . कात्री या गावालगत वर्धा नदी आहे व कात्री या रेती घाटावरून यवतमाळ जिल्ह्यातील व काही आजूबाजूच्या परिसरातील रेती तस्कर खुलेआम व भर दीवसा व रात्रीला सरोजपणे जहाजाच्या साह्याने बोटीच्या साह्याने रेतीचा उपसा करत आहे .वर्धा नदी वरूनच कात्री या गावातील नागरिक बांधवांना ग्रामपंचायत द्वारा नळाला पाणीपुरवठा आहे केल्या जातो मात्र रेती ऊपसा मूळे पूर्ण गावात अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे .
कात्री या गावातील लोकांच्या नळाला अशुद्ध पाणी येत आहे येत आहे याबाबत वरिष्ठांना कात्री या गावातील लोकांनी तक्रार सुद्धा केली होती .
नदीतून नेहमी रेती उपसा होत आहे त्यामुळे कात्री या गावातील नागरिक बांधवांना पिण्याचे पाणी हे गढूळ येत आहे .


त्यामुळे ग्रामस्थ यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम सुद्धा होत आहे नागरिक बांधव महिला यांची आरोग्य धोक्यात आले आहे याकडे त्वरित महसूल विभागाने व पोलीस वीभागाने लक्ष देऊन अवैध रेती तस्करांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ बांधव करीत आहे .